कुठल्याच पाठ शाळेत
प्रेम शिकवता येत नाही..
शिकल्यावरच प्रेम कळतं
अस ही काही असत नाही..
निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही..
प्रेम म्हणजे भावनांचा खेळ
तो शिकवता येत नाही यालाच
प्रेम म्हणतात असं काही शास्त्र
नाही..
प्रेमात पडल्यावर ही कां
प्रेम करतो सांगता येत नाही..
कधी फक्त एका नजरेत
प्रेम कळून जातं कधी कुणाच्या
सहवासात प्रेम भेटून जातं..
प्रेम आयुष्यात आल्यावर
जगणं मात्र बदलून जातं..
सारं काही तेच असून ही
वेगळ्या विश्वात घेऊन जातं..
सर्वस्व ओवाळून टाकावं
इतकं कुणी आवडून जातं
दोन आत्म्यांच मिलन प्रेम
भेटता होऊन जातं..
ज्याला भेटतो प्रेमाचा
अनुभव त्यालाच प्रेम कळून
जातं..
बाकीच्यांच्या लेखी प्रेम
म्हणजे वेड्यांच जग होऊन
जात..