एका प्रियकर सोडून गेलेल्या प्रियासीची व्यथा…..
माझ्या अबोल ओठावर
नकळत तुझच नाव येतं…..
तुला एक क्षणी पहायला
मन हे नेहमी झुरत राहतं…..
क्षणातच भावनानांच आभाळ
डोळ्यात ढग बनून दाटून येतं…..
माझं वेड मन रे हे शोन्या
फक्त तुलाच रे मागतं…..
तुला विसरायच म्हटल तर
मन अजुनच तुझ्यात गुंतत जातं…..
तुझी आठवण आली की
नकळत डोळ्यात टचकन पाणीच येतं….