खूप वाईट घडलं आपल्यात
मलाही माहित आहे
म्हणून तू मला विसरून जाणे
हे चूकीचे आहे ना…
आपणचं ठरवलं होत ना…
कधीचं सोडायची नाही साथ एकमेकांची…
पण ???
आयुष्यात कुठे काय
ते मोठे वादळ आले
अन् आपल्याला एकमेकां पासून
दूर करून गेले…
कधीतरी विचार कर परत येण्याचा
मी नाही काही बोलेन तुला
तू फक्त माझ्याकडे येण्याचा
प्रयत्न तर कर…
मी स्विकारेन तुला सगळ्या
दुःखा सहीत
नको देऊस सुख मला…
पण ???
असा एकटा तरी नको
सोडून जावूस मला माहीत आहे
तू फार जिद्दी आहे…
नाही येणार तू परत
तरी मी वाट पाहिन तुझी
या श्वासाचा अंत होईपर्यंत…